Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जल जीवन मिशन योजनेच्या लाभापासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
May 2, 2023
in राजकीय
0
जल जीवन मिशन योजनेच्या लाभापासून एकही व्यक्ती वंचित राहणार नाही ; पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार  l प्रतिनिधी

 

प्रत्येक गावांत जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवितांना एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

नंदुरबार तालुक्यातील नळवे खु. व पाचोराबारी येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,  सरपंच श्रीमती. सरुबाई नाईक (नळवे खुर्दे) , उपसरपंच  प्रेमचंद बंजारा, पाचोराबारी येथील सरपंच व उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते  श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, जलजीवन मिशन योजनेत प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यासाठी भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करुन पुढील 30 वर्षांचे नियेाजन केले आहे. ही योजना 2024 पर्यंत पूर्ण करावयाची असल्यामुळे प्रत्येक गावातील एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता  घ्यावी. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने नियमित ग्रामसभा घ्याव्यात.  प्रत्येक व्यक्तींला 55 लिटर दरडोई पाणी मिळणार असल्याने पाण्याचा वापर अधिक होईल व त्यातून सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने येत्या काळात भूमिगत गटाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत प्रत्येक वाडा, वस्ती व पाड्यांत जाण्यासाठी बारमाही रस्ते तयार करण्यात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्या व्यक्तींना स्वत:चे घर नाही तसेच ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व समाजातील लोकांसाठी घरकुल योजनेतून घरे देण्यात येणार आहे. महिला बचत गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाना विविध योजनेच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. आदिवासी समाजातील नागरिकांना गाई, म्हशी, बकरी देण्यात येते त्याच पद्धतीने इतर समाजातील लोकांनाही त्या देण्यासाठी आमचा शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच गाई व म्हशीसाठी शेड उपलब्ध करुन देण्यात येईल. येत्या काळात आदिवासी विकास विभागातून खावटी देण्यात येईल. पाचोराबारी येथील शेतकऱ्यांना विरचक धरणाचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाटचारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित म्हणाल्या की, या गावासाठी एमआरईजीएसच्या माध्यमातून गटारी, क्रॉकीट रस्ते, पेवर ब्लॉकचे कामे मंजूर झाले असून ते लवकरच सुरु करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळया योजनाच्या माध्यमातून शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्राची दूरुस्ती करण्यात येईल. तांडावस्ती योजनेंतर्गत क्रॉकींट रस्ता मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलजीवन मिशनमुळे प्रत्येक कुटूंबाला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार असल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, आपल्या नळवे खुर्दे गावात दुसऱ्यांदा भूमीपूजन करण्याची संधी मिळाली आहे. यापुर्वी समाज मंदीराचे भूमीपूजन आपल्या गावात संपन्न झाले. आज आपल्या गावात येथील नागरिकांसाठी  जल जीवन मिशनच्या योजनेचे भूमीपूजनासाठी मी आले आहे. मला आपणास कळविण्यास अंत्यत आनंद होत आहे की, या गावासाठी 150 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मी केंद्र शासनाकडून मंजूर करुन घेतली आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी एखाद्या गावासाठी इतका निधी सहसा मिळत नसतो. यापुर्वी केंद्र व राज्याची नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात येत होती. परंतू योजना राबवितांना काही ठिकाणे या योजनेतून राहून जात होती तर काही ठिकाणी या योजनेची द्विरुक्ती होत असे त्यामुळे  देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीनी ठरवले की या दोन वेगवेगळया योजनाचे एकत्रित करुन जलजीवन मिशन योजना सुरु केली. यासाठी मी नंदुरबार व धुळे लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गाव, पाड्यात ही योजना राबविण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली  त्यानुसार  ती मान्य करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जल जीवन मिशनअंतर्गत नळवे खु. गावातील 3 हजार 628 लोकसंख्या गृहीत धरुन  147.20 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन  संपन्न झाले. यात नविन विहीर, उद्धरण नलीका, पंपींग मशिन, पंप हाऊस, उंच जागी जलकुंभ बांधणे व वितरण व्यवस्थेचा समावेश राहील. तसेच जल जीवन मिशनअंतर्गत पाचोराबारी  गावातील 7.68 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या कामात विंधन विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ,वितरण व्यवस्था, पाईपलाईन, शुद्ध व अशुद्ध पंपिग सेटचा समावेश राहील. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्याचा मानस- पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

Next Post
नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

नंदुरबार येथे ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर साधला निशाणा

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर साधला निशाणा

June 15, 2025
कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे  सामोरे जावं; आ.चंद्रकांत रघुवंशी

कार्यकर्त्यांनी निवडणुकीला प्रामाणिकपणे सामोरे जावं; आ.चंद्रकांत रघुवंशी

June 15, 2025
आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकुवा येथे बचत गटाच्या महिला मेळावा

June 15, 2025
शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते ॲम्बुलन्सचे लोकार्पण

June 10, 2025
शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

June 10, 2025
संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

June 10, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group