Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्पदंशाने मयत महिलेचा परिवाराला आ. ॲड. के.सी. पाडवी पाडवी यांच्या कडून आर्थिक मदत, रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा दिला इशारा

team by team
September 7, 2022
in राजकीय
0
सर्पदंशाने मयत महिलेचा परिवाराला आ. ॲड. के.सी. पाडवी पाडवी यांच्या कडून आर्थिक  मदत, रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा दिला इशारा
नंदूरबार   l  प्रतिनिधी 
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी  ग्रामीण रुग्णालय वेळेत उपचार न मिळाल्याने काठी येथील २२ वर्षीय निलिमा वळवी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर धडगाव अक्कलकुवा मतदार संघाचे आ.ॲड. के. सी. पाडवी यांनी काल अक्कलकुवा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.
 आ.ॲड. पाडवी यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालय आणि पोषण पुनर्वसन केंद्राला भेट तेथील सुविधांची पाहणी केली तसेच आरोग्य प्रशासनाच्या कारभाराच्या संदर्भात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून रिक्त पदे आणि प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारामुळे सातपुड्यात आरोग्य यंत्रणा सलाईन वर असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
 महविकास आघाडीच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आसल्या तरी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून योग्य नियोजन केले जात नसल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले .सरकारने  सातपुड्यातील आरोग्य समस्या आणि कुपोषणाचा प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष द्यावे.आरोग्याचा समस्या राजकारण न करता जिल्ह्यातील सर्वच पक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मयत निलिमा वळवी यांच्या परिवाराला आर्थिक मदत
आ.ॲड. के.सी. पाडवी यांनी काठी येथे जाऊन मयत नीलिमा वळवी यांच्या परिवाराची भेट घेतली त्यांना शासकीय स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगितले. त्यासोबत पाडवी यांनी मयत महिलेच्या परिवाराला आर्थिक मदतही केली. यापुढे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आरोग्य सुविधां न मिळाल्याने कुणाचा जीव जात असेल खपवून घेतले जाणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
रिक्त पदांच्या प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक रिक्त पदे असून ही रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार असून याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या इशारा त्यांनी दिला आहे महाविकास आघाडीच्या काळात ही रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आताच्या सरकारने ही आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून यात कुठलेही राजकारणात दुर्गम भागातील आणि जिल्ह्यातील   आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या प्रश्न त्वरित मार्गी लावावा अशी मागणी आ.ॲड. पाडवी यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यातील सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध, आज सरपंच पदासाठी ८९ तर सदस्य पदासाठी २७३ उमेदवारांनी उमेदवारी मागे

Next Post

विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

Next Post
विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्रांने हल्ला, तीन जण जखमी दंगलीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add