शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव साजरा करण्याचा अनुषंगाने शनिवार दि.13 रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते.
दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभर ‘ हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे.पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या सहयोगाने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या ‘स्टेच्यु ऑफ मोटीवेशनल पॉवर’ येथून नंदुरबार जिल्हा परिषद सदस्या सौ. कांचनताई पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सोबतच कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या विषयावर पथनाट्य सादर केले. प्रसंगी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील,सौ. माधवीताई पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालय प्रवेशद्वारापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,शहादा मार्गे मलोणी रॅलीचे मार्गक्रमण होते. त्यात सुमारे 750 हुन जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी, स्वयंसेवक, छात्र, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे सातपुडा शाळेतील छात्र व शिक्षकांनी सुद्धा उस्फुर्त सहभाग नोंदवला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या संविधान-अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव या विषयावरील पथनाट्य सादरीकरणाने रॅलीची सांगता झाली.रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
उपप्राचार्य डॉ.एस.डी.शिंदखेडकर, डॉ.एम.के.पटेल, उपप्राचार्या प्रा. कल्पना पाटील, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व
प्राध्यापक वृंद, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्र पाटील, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख लेफ्ट. एस.एल.भालेराव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मृणाल जोगी, क्रीडा विभाग संचालक डॉ. अरविंद कांबळे आदिंनी परिश्रम घेतले.








