नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील साक्षी मेमोरियल फाऊंडेशनकडून नाशिक मधील धार्मिक व पवित्र स्थान असलेल्या पंचवटीत आलेल्या भाविकांसाठी व रस्त्यावरील निराधारांसाठी दिवंगत साक्षी हिच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

पंचवटीत दररोज संपूर्ण भारतातून असंख्य भाविक येत असतात . अनेक भाविकांची रहाण्या खाण्याची सोय नसते व हॉटेलचे जेवण सर्वांनाच परवडते असे नाही . अशा भाविकांना उपाशी किंवा अर्धपोटी रहावे लागते व त्यांची उपासमार होते . ही बाब लक्षात घेऊन नंदूरबार येथील साक्षी मेमोरियल फाऊंडेशन यांच्याकडून अन्नदानाचा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा संगिता दिलीप साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाचा लाभ अनेक भाविक व गरजूंनी घेतला . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील नामवंत सेवाभावी संस्था अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेचे वित्तीय संचालक भिकन दंडगव्हाळ उपस्थित होते . श्री . दंडगव्हाळ यावेळी म्हणाले की , ” भारतीय संस्कृतीत भुकेलेल्यांना अन्नदान करण्याचे मोठे महत्व आहे . अन्न ही एकमात्र अशी बाब आहे की ज्यामुळे शरीरासोबतच आत्माही तृप्त होतो आणि त्यामुळेच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ” , कार्यक्रमाच्यावेळी संस्थेचे खजिनदार राजेंद्र वसंत शिंदे , सदस्या कल्पना राजेंद्र साळुंके , भावना सुनिल साळुंके व साळुंके परिवारासह संस्थेचे हितचिंतक राजेंद्र हिरे , निरंजन गोसावी , सोमनाथ जाधव , विलास बेडसे , डी . एम . पाटील आदि उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या सर्वांनी परिश्रम घेतले .








