Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर चौपदरीकरणासाठी मंजुरी, दोन महिन्यानंतर कामाला होणार सुरुवात : खा. डॉ. हिना गावीत

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर चौपदरीकरणासाठी मंजुरी, दोन महिन्यानंतर कामाला होणार सुरुवात  : खा. डॉ. हिना गावीत

सारंगखेडा l प्रतिनिधी
तळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी संसदेमध्ये सातत्याने मागणी करत चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे घर धूरमुक्त घर व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना पुन्हा सुरू करण्यात आली असून जिल्हयातील एक लाख महिलांना गॅस जोडणी देण्यात येणार आहे.दरम्यान बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा मार्ग चौपदरीकरणासाठी मंजूर झाला असून दोन महिन्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे . असल्याचे प्रतिपादन खा.डॉ . हिना गावीत यांनी केले .
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील दत्त मंदिर सभागृहात प्रधानमंत्री उज्वला २ योजनेतंर्गत गॅसची शेगडी वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या . कार्यक्रमात आमदार डॉ . विजयकुमार गावीत , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल , जिल्हा परिषद सदस्या डॉ . सुप्रिया गावीत , जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल , पंचायत समिती सदस्या रत्ना पवार ,सरपंच पृथ्वीराजसिंह रावल , कोठलीचे सरपंच राहूल पाटील , देवेंद्र बोरसे , उपसरपंच अनिता न्हानभो भील , देऊरचे सरपंच रेखा गिरासे , वासुदेव पाटील , नारायण सामुद्रे , संजय भदाणे , सुभान पाटील , संतोष मोरे , ग्रामसेवक श्री . चव्हाण , दिपिका ठाकरे आदी उपस्थित होते . पुढे बोलतांना खा . गावीत म्हणाल्या की , उज्वला योजना बंद झाली होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेबाबत व जिल्ह्यात अनेक महिलां या योजने पासून वंचित आहेत . म्हणून ही योजना प्रधानमंत्री उज्वला २ नावाने पुन्हा सुरू करण्यात आली जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल . तसेच बचत गटातून महिलांना स्वयंम रोजगार उपलब्ध व्हावा . महिला सक्षम व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहेत . महिलांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी आणि सन्मानासाठी शासनाचे अनेक योजना सुरू केल्या आहेत . त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू अशी ग्वाही दिली . हर घर नल हर घर जल योजनतंर्गत जिल्हयातील गावाचा प्रत्येकांचा घरात नळाद्वारे शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे .केंद्रातर्गत या योजनेचे कामे अनेक गावांमध्ये सुरू झाले आहे . तसेच बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर हा मार्ग चौपदरीकरणासाठी मंजूर झाला असून दोन महिन्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे . शहादा . दोंडाईचा रस्त्यालाही मंजूर मिळाली असून तत्काल रस्त्यावरील खड्डयांची डागडूगी करण्यासाठी निधी मंजूर केली आहे . यावेळी आ .डॉ . गावीत , जयपाल रावल , सुप्रिया गावीत यांनी मनोगत व्यक्त केले .देऊर , टेंभा , बिलाडी , कोठली , कळंबू , अनरद येथील ३५० लाभार्थी उपस्थित होते . सुत्रसंचालन पी .टी. पाटील यांनी केले तर आभार निलेश पाटील यांनी केले .

बातमी शेअर करा
Previous Post

मां बेटी गार्डनमध्ये दशामाता मूर्तीची रविवारी प्रतिष्ठापना

Next Post

कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कार्यभार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वर्ग करा, ॲड.रुपसिंग वसावे यांचे मेहबूब शेख यांना निवेदन

Next Post
कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कार्यभार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वर्ग करा, ॲड.रुपसिंग वसावे यांचे मेहबूब शेख यांना निवेदन

कोलवीमाल गावाचा पोलीस ठाण्याचा कार्यभार अक्कलकुवा पोलीस ठाण्यात वर्ग करा, ॲड.रुपसिंग वसावे यांचे मेहबूब शेख यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add