Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्यावे, खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा : एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

team by team
February 2, 2022
in राजकीय
0
तळोदा प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्यावे, खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा :  एकलव्य आदिवासी युवा संघटनेची मागणी

म्हसावद l प्रतिनिधी
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने तळोदा प्रकल्प कार्यालयातील माकत्या वसावेला पुन्हा कामावर घ्यावे तसेच खोटा गुन्हा दाखल केला आहे तो घेण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व निवेदनात म्हटले आहे की, दि.31 डिसेंबर 2021रोजी एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्यावतीने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तळोदा यांना निवेदन सादर करण्यात आले होते.सदर निवेदन देऊन 1महिनाचा कालावधी उलटल्यानंतर देखील त्यांना सेवेत घेण्यात आले नाही.सदर निवेदनातून सदर घटनेचा घटनाक्रम नमूद करून त्यांच्याविरूध्द खोटया स्वरूपाची तक्रारी अर्ज करून त्या कारणावरुन त्यांना सदरच्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.त्यामुळे आदिवासी संघटनांनी तीव्र शब्दात आक्षेप नोंदविला असून ज्या लोकानी तालुका व्यवस्थापक माकत्या वसावे यांच्या विरुध्द तक्राऱ्या केल्या होत्या त्यास बनावट स्वरूपाचा असल्याचा खळबळजनक खुलासा दि.03 जानेवारी 2022 रोजी तक्रारदारांपैकी अनेक लोकांनी आरोपी यादीतून नांव कमी करून उलट सदरच्या नावाचा गैरवापर झालेला दिसुन आला आहे.अशी गंभीर स्वरूपाची मागणी आरोपी यादीतील काही लोकांनी केली आहे
अशा सर्व परिस्थितीवरून स्पष्ट होते की माकत्या वसावे यांचेवर कोणत्या कारणाच्या आधारे कार्यवाही करण्यात आली हा एक संशोधनाचा विषय उपस्थित झाला असून. एकिकडे तक्रारदाराच्या म्हणन्यानुसार आम्ही कोठेही तक्रार केली नाही यावरून असे दिसून येत आहे की, फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यांचेवर हि कार्यवाही झालेली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.दि 31 डिसेंबर 2021 रोजी संघटनेने कायदेशीर कार्यवाही होण्याची मागणी करून देखील प्रशासकीय स्तरावरून कोणतीही कार्यवाही झालेली नाही व त्यांना जाणीवपूर्वक व हेतूपुरस्कर त्यांना दुर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रादारांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर जिल्हधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले होते.असे असतांना देखील तक्रादारांच्या मागण्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून तक्रारदार मागणी मान्य करण्यात आली नाही.म्हणुन दि.10 जानेवारी 2022 रोजी जिल्हधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असून यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुर्णत: प्रशासन जबाबदार असणार सदर तक्रारीची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड.गणपत पाडवी.नंदुरबार जिल्हाअध्यक्ष रवी सोनवणे,नंदुरबार शहराध्यक्ष गणेश सोनवणे,पावबा वळवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आमदार राजेश पाडवी उनपदेव येथे पाहणी करीत जाणून घेतल्या समस्या

Next Post

अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग विभागीय संघटकपदी चित्तरंजन पाटिल यांची निवड

Next Post
अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग विभागीय संघटकपदी चित्तरंजन पाटिल यांची निवड

अ.भा.फार्मसिस्ट असोसिएशच्या महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग विभागीय संघटकपदी चित्तरंजन पाटिल यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add