Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विकास केला नाही, असा आरोप करणाऱ्यांना आता मतदार जागा दाखवतील; डॉ.विजयकुमार गावित यांचा विश्वास

team by team
November 3, 2024
in राजकीय
0
विकास केला नाही, असा आरोप करणाऱ्यांना आता मतदार जागा दाखवतील; डॉ.विजयकुमार गावित यांचा विश्वास

नंदुरबार l प्रतिनिधी-

आम्ही तीस वर्षात या जिल्ह्याचा कायापालट घडवणारे जितके काम केले आणि निधी दिले तेवढे याच्यापूर्वी जिल्ह्यातील दुसरे कोणी केले का? यावर मतदार स्वतः चांगला जागरूक आहे आणि त्यामुळे मी केलेल्या विकास कामावरच ते शिक्का मारतील याचा मला विश्वास आहे. आम्ही तीस वर्षात या जिल्ह्याचा विकासच केला नाही, हा आरोप करणाऱ्यांना आणि आम्ही विकासाची कोणती कामे केली? असा प्रश्न करणाऱ्यांना जनता नक्कीच जागा दाखवेल; असा विश्वास नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे तथा महायुतीचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.

 

नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील भाजपा तथा महायुतीचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित सध्या नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात भेट देऊन मतदारांशी संवाद साधत आहे. त्यासाठी गावागावात कॉर्नर सभा घेत आहेत.

 

या अंतर्गत त्यांनी रनाळे जिल्हा परिषद गटातील गावांना भेटी दिल्या. रजाळे, बलवंड, सैताणे, खर्दे, बैंदाणे, आसाने, तलवाडे बु., रनाळे, उमर्दे खु., नांदखें, वासदरे, पिंप्री व अन्य गावांमधील मतदारांशी संवाद साधून त्यांनी समस्या जाणून घेतल्या. यादरम्यान कॉर्नर सभेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

 

 

भाषणात ते पुढे म्हणाले, मतदान करताना मतदार जर एकदा चुकला तर पूर्ण मतदार संघ पाच दहा वर्ष मागे जातो. म्हणून स्वतःच्या स्वार्थापायी लोकांची दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांना आणि नेत्यांना भुलू नका. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आतापर्यंत अनेक नेते घडून गेले परंतु बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य, दारिद्र्य गरिबी याने ग्रासलेल्या इथल्या वंचित समूहाचा कोणताही विकास झालेला नव्हता.

 

परंतु तीस वर्षांपूर्वी राजकारणात आल्यानंतर सर्वप्रथम नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आणून मी विकासाला गती दिली. विविध प्रकारचे पाणी प्रकल्प पूर्णत्वास आणले प्रत्येक गावासाठी रस्ते पाणी विज देण्याबरोबरच शेती विकास करणाऱ्या योजना राबवल्या. केवळ विकासाचा दृष्टिकोन असलेला उमेदवार आपण निवडून दिला म्हणून हे घडले. आताही सर्व मतदारांनी विकास कार्य गतिमान ठेवण्यासाठी जाती धर्मावर आधारित दिल्या जाणाऱ्या भुलथापांना बळी न पडता मतदान करावे; असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भवर शिवारात खुनी बिबट्या अखेर जेरबंद

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 32 उमेदवारांची माघार

Next Post
नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 32 उमेदवारांची माघार

नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघात 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 32 उमेदवारांची माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add