Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारमध्ये विरोधकांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : डॉ.हिना गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
July 16, 2024
in Uncategorized
0
नंदुरबारमध्ये विरोधकांचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा  : डॉ.हिना गावित

 

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या (त्यावेळेचे उध्दव गटाचे व आताचे शिंदे गटाचे) इतर कडबोळ्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र २०२१ मध्ये जलजीवन योजना नंदुरबार जिल्ह्यात लागू करण्यात आली व तिच्या कामांचे नियोजन झाले, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार के.सी. पाडवी होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा काँग्रेसच्या सीमा वळवी होत्या तर उपाध्यक्ष राम रघुवंशी होते.आपल्याच कार्यकाळात मंजूर केलेल्या योजनांना, त्या भाजपच्या आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करणारे विरोधक म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केला.

ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेसच्या सत्ता काळात नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत जलजीवन मिशन योजनेची कामे मंजूर करण्यात आली. व त्या योजनेचा डीपीआर व सर्वेक्षणही त्यांनीच मंजूर केले. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट म्हणून गाजलेले कार्यकारी अभियंता बाविस्कर यांच्या नातेवाईकालाच सर्वेक्षणाचे काम त्यांनी दिले. आ. के. सी. पाडवी यांच्या गळ्यातला ताईत असलेला भ्रष्ट अभियंता बाविस्कर यांच्या मर्जीतील एजन्सीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन ग्रामसभा घेऊन डीपीआर आणि अंदाजपत्रके तयार करणे आवश्यक होते. मात्र के.सी. पाडवी आणि जि.प. अध्यक्ष सीमा वळवी यांचा वरदहस्त डोक्यावर असल्यामुळे संबंधित एजन्सीने कार्यालयात बसून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्याची कोणतीही खातरजमा, पडताळणी न करता, डोळे मिटून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी व तत्कालीन पदाधीकारी यांनी सदर अहवाल मंजूर करून त्यावर सह्या केल्या. तिथेच या योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यावेळेचे आ.के.सी. पाडवी यांची पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांचे देखील जबाबदारी होती. सदर विषयी पालकमंत्री यांनी एकही बैठक घेतली नाही. त्यावरुन त्यांचे जिल्ह्याच्या विकास कामाविषयीचे गांभिर्य दिसून येते.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240716-WA0129.mp4

कमिशन देऊन बनवलेला डीपीआर, बनावट सर्व्हे यामुळे बहुतांश गावांमधील घरे, गल्ल्या आणि वसाहती यांची कोणतीच नोंद घेण्यात आलेली नव्हती. २०२१ मध्ये कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर या गावांमध्ये कामे करायला ठेकेदार पोचले तेव्हा तेथील रहिवाशांनी योजनेत सर्व घरांचा समावेश करा अशा वाजवी मागण्या केल्या. त्यांची पूर्तता होत नसल्याने कामे बंद पडली. तत्कालीन पालकमंत्री या कामांवरची मलाई खाऊन मोकळे झाले, मात्र त्याचा खूप मोठा फटका जलजीवन योजनेच्या विकास कामांना बसला असल्याचे डॉक्टर येणार आहे त्यांनी सांगितले. त्यापुढे म्हणाल्या की,
डॉ. सुप्रिया गावित यांनी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी कार्यभार स्वीकारली, त्यावेळी जलजीवन मिशन योजनेची प्रथम आढावा बैठक घेतली. त्यापूर्वीच जलजीवन मिशन योजनेतील कामांचे जिल्ह्यात ९०% पेक्षा जास्त कार्यारंभ आदेश पारित झाल्याचे दिसून आले. हे आकडेवारीच बोलते.

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/07/VID-20240716-WA0128.mp4

२०२१ मध्ये नोव्हेंबरअखेर २० कामे, १२ जानेवारी २०२२ ला ३३ कामे, २ मार्च २०२२ ला २१९ कामे, २९ मार्च २०२२ मध्ये ८७ कामे, २० एप्रिल २०२२ ला २१४ कामे, १३ मे २०२२ ला २९६ कामे तर २६ जून २०२२ ला ५७३ कामे, ४ सप्टेंबरला ८४७ कामे २५ सप्टेंबरला ४८५ कामे २९ ऑगस्टला ४२६ कामे तर दहा ऑक्टोबरला ९२ कामांना मान्यता मंजुरी देण्यात आली होती. हे पाप काँग्रेसचे होते, पालकमंत्री आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचे होते. त्यांना संमती देणाऱ्या होयबा पदाधिकाऱ्यांचे होते.

डॉ. सुप्रिया गावित यांच्या कार्यकाळात ३१ ऑक्टोबरला पाच, नऊ डिसेंबरला ९६, २८ डिसेंबरला १३, १८ जानेवारी २०२३ ला चार, २५ जानेवारीला दोन, १६ फेब्रुवारीला ५६ तर २३ मार्चला सहा एवढ्याच कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील मिशन जलजीवन योजनेच्या कामांमधील त्रुटी बाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोप प्रत्यारोप झाले. कार्यकारी अभियंता बाविस्कर यांच्या हकालपट्टी बाबत भारतीय जनता पक्षातर्फे मागणी करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेच्या (त्यावेळेचे उध्दव गटाचे व आताचे शिंदे गटाचे) नेते विजय पराडके, सी. के. पाडवी, रतन पाडवी, देवमन पवार, मोहन शेवाळे, ऐश्वर्यादेवी राऊळ हे सुद्धा बाविस्कर (कार्यकारी अभीयंता) यांच्या हकालपट्टीची मागणी करीत होते आणि अगदी मोठा विनोद म्हणजे शिंदे गट त्यावेळी जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी होता, मग बाविस्कर यांचा भ्रष्टाचार सुरू असताना ते काय करत होते आणि त्याहून मोठा विनोद म्हणजे आज विजय पराडके, सी. के. पाडवी, रतन पाडवी, देवमन पवार, मोहन शेवाळे, ऐश्वर्यादेवी राऊळ इतर कडबोळ्यासोबत आंदोलन करीत आहेत. बाविस्कर यांचा बचाव करण्यासाठी कोण पुढे आले होते, याचा विचार करायला हवा. म्हणजे सर्वेक्षण झाले काँग्रेसच्या मर्जीने। जुन्या दराने डीपीआर बनवला काँग्रेसच्या मर्जीने !! कार्यालयात बसून केलेल्या सर्वेक्षणाला मान्यता दिली काँग्रेसने !!! कामांना मंजुरी देणारे तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी व तत्कालीन पदाधीकारी !!! आणि आता हीच सर्व मंडळी एकत्र येऊन केवळ आणि केवळ डॉ. सुप्रिया गावित व गावित कुटुंब यांच्या विषयीच्या द्वेष बुद्धीने आंदोलन करीत आहेत. पण जनता सुज्ञ आहे. खरे चोर कोण, नंदुरबारच्या विकासाची कोणी वाट लावली ? कोणी किती मलिदा खाल्ला ? हे सर्वांनाच ठाऊक आहे. गायब आमदार म्हणून राज्यात फेमस झालेले आ. के. सी. पाडवी यांचा हा निव्वळ इलेक्शन स्टंट आहे. आजपर्यंत स्वतःच्या मतदार संघात कोणतीच भरीव विकास कामे करता न आल्याने संभाव्य पराभवाची भीती त्यांच्या मनात दाटली आहे. त्यामुळे इतर कडबोळी सोबत घेऊन ते आंदोलनाचा दिखावा करीत आहेत. पण निव्वळ चोरांनी उलट्या बोंबा मारून उपयोग नाही. डॉ. सुप्रिया गावित यांचे काम खणखणीत आहे. वाडीपाड्यातल्या गोरगरीब आदिवासींना प्रत्येक योजनेचा लाभ कसा मिळेल याकडे त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले आहे. त्या जनतेच्या मनामनात आहेत. त्यामुळे विरोधकानो, लोकांची दिशाभूल करणे थांबवा, लोकांमध्ये जा आणि लोकांची कामे करा आणि मग आंदोलने करा एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

डॉ. विजयकुमार गावीत साहेब, आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री झाल्या नंतर जल जीवन मिशन योजना बाबत सविस्तर आढावा घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक योजने पासुन वंचित गांव, पाडे, वस्त्या, ग्रामिन भागातील नवीन वसाहती कॉलनी यांचा समावेश करुन घेण्याचे निर्देश देऊन प्रत्यक्षात त्या स्वरुपाचे प्रस्ताव तयार करुन शासनास पाठविला. तत्कालीन पालक मंत्री तथा आदिवासी मंत्री यांना इतक्या मोठ्या प्रमाणात गांव, पाडे, वस्त्या, ग्रामिन भागातील नवीन वसाहती कॉलनी यांना दिसले नाहित का…. या योजनेस ५० टक्के निधी आदिवासी विकास विभागाकडुन दिला जातो, निदान आदिवासी विकास मंत्री म्हणुन या वंचित भागांचा विचार के. सी. पाडवी यांनी पाहिजे होता. परंतु नेहमी प्रमाणे ते मतदार संघापासुन लांबच असतात. असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आंदोलकांनी धरले मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धारेवर; दीर्घ चर्चेनंतर दिले आश्वासन

Next Post

साक्षरतेची वारी काढून निरक्षरता घालवण्याचा प्रयत्न करूया : सौ सुषमा शाह

Next Post
साक्षरतेची वारी काढून निरक्षरता घालवण्याचा प्रयत्न करूया : सौ सुषमा शाह

साक्षरतेची वारी काढून निरक्षरता घालवण्याचा प्रयत्न करूया : सौ सुषमा शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group