नंदूरबार l प्रतिनिधी
येथील जी. टी .पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. माधव कदम यांनी नुकतेच उदगीर येथे संपन्न झालेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी’ संमेलनात आपला सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उदयगीरी महाविद्यालय व अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात गुजरात व मध्य प्रदेश लगतच्या सीमावर्ती भागातील नंदुरबार जिल्ह्यातील प्राध्यापक डॉ. माधव कदम यांची सीमावर्ती भागातील निमंत्रित कवी म्हणून निवड करण्यात आली होती. संमेलनाच्या कवि विभागात सीमावर्ती भागातून नंदुरबार मधून ते एकमेव निमंत्रित कवी म्हणून सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे हे संमेलनाचे अध्यक्ष होते. तर राज्यमंत्री संतोष बनसोडे स्वागताध्यक्ष होते. निमंत्रित कवींच्या काव्यवाचन समारंभासाठी लक्ष्मण लच्छमन्ना हे अध्यक्ष होते .डॉ. माधव कदम यांनी आपली “वावर “ही कविता कवी संमेलनात सादर केली. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानधन देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जळगांव, धुळे-नंदूरबार चे पदाधिकारी व मार्गदर्शक माजी प्राचार्य तानसेन जगताप,जेष्ठ प्राध्यापिका डॉ.शशिकला पवार मॅडम यांच्यासह सर्वांनी अभिनंदन केले आहे.








